Ticker

6/recent/ticker-posts

172 चं संख्याबळ असताना आघाडीची 10 मते फुटली कशी ?; आघाडीचं गणित कुठे चुकलं ?

मुंबई: दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर मध्यरात्री 3 वाजता राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला. अपेक्षप्रमाणे महाविकास आघाडीचे तीन आणि आणि भाजपचे दोन खासदार निवडून आले. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये अटीतटीची चुरस होती. त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार  निवडून येणार की भाजपचे धनंजय महाडिक  विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले. पवार यांना केवळ 33 मते पडली. तर संख्याबळ नसतानाही महाडिक यांना 41 मते पडली. त्यामुळे महाडिक विजयी झाले. या निवडणुकीत तब्बल महाविकास आघाडीची तब्बल 10 मते फुटली. विशेष म्हणजे 17 अपक्ष आमदारसोबत असूनही महाविकास आघाडीचे 10 आमदार फुटले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोणत्या अपक्षांनी 10 मते भाजपला दिल? नेमकी आकडेवारी काय आहे? याचाच घेतलेला आढावा.

आघाडीचं काय होतं गणित?

महाविकास आघाडीकडे 172 आमदारांचं पुरेसं संख्याबळ होतं. शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादीकडे 51 आणि काँग्रेसकडे 44 मते होती. म्हणजे आघाडीकडे एकूण 150 मते होती. सोबत अपक्षांची 17 मते मिळून 167 मते आघाडीकडे होती. या शिवाय एमआयएमची 2 आणि बविआकडे 3 मते होती. ही सगळी गोळाबेरीज 172 मतांची होती. आघाडीचे चार उमेदवार रिंगणात उभे होते. 172 मतांची समसमान वाटणी केल्यास प्रत्येक उमेदवाराला 43 मते मिळतील अशी परिस्थिती होती. मात्र, प्रत्यक्षात उलटे झाले.

मतांचं समान वाटप झालंच नाही

आघाडीकडे 172 मते होती. त्यामुळे आघाडीच्या उमेदवारांना प्रत्येकी 43 मते जाणे अपेक्षित होते. मात्र, निकालात प्रत्यक्ष भलताच आकडा समोर आला आहे. प्रत्येकाला 43 मते मिळणं अपेक्षित असताना काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना 44 मते मिळाली. म्हणजे प्रतापगढी यांना एक मत अतिरिक्त मिळालं. तर राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना बरोबर 43 मते मिळाली. राऊत यांना 42 मते मिळाली. त्यांचं एक मत बाद झालं. शिवसेनेच्याच उमेदवाराचं मत बाद झाल्याने राऊतांना फटका बसला. पण संजय पवार यांना 33 मते पडली आहेत. त्यांना तब्बल दहा मतांचा फटका बसला.

Post a Comment

0 Comments