राणांवर चुकीचे केस दाखल केली-कंबोज
नवनीत राणा दिल्लीत जाऊन राज्य सरकारची तक्रार तर करणाच आहेत. मात्र भाजप नेत्यांनीही आज त्यांच्या घरी दाखल होत. त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. भाजप नेते मोहीत कंबोज यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. कोर्टानेही सांगितलं की हनुमान चलीसाचा पाठण करणं देशद्रोह होत नाही. राज्य सरकार भाजप आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांच्या वापर करत आहे. एकीकडे चुकीची केस आणि त्यानंतर एका खासदार महिलेवर पोलीस ठाण्यात गैरव्यहार करण्यात आला. याची चौकशी झाली पाहिजे. उद्या नवनीत राणा आणि रवी राणा दिल्ली जाणार तिथे होम सेक्रेटरी आणि मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. माझी मागणी आहे की खार पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनची चोकशी झाली पाहिजे, असे कंबोज म्हणाले.
0 Comments