Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलिसांना सॅल्यूट ! महिनाभरात ४८७ बेपत्ता मुलांचा शोध; विशेष मोहिमेची मेहनत


       मुंबई पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप . शोध मोहिमेत           पोलिसांना आले यश
मुंबईमधून बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या अधिक आहे. बेपत्ता, अपहरण करण्यात आलेल्या, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त असल्याने मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विशेष मोहीम हाती घेतली. 'ऑपरेशन री-युनाइट' या जवळपास दीड महिना चाललेल्या मोहिमेत ४८७ मुलांचा शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले. शोधलेल्या मुलांमध्ये २३० मुले आणि २५७ घटना या १४-१५ वर्षाच्या मुलींना
लग्न करणार असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून जाते. या सर्व घटना पाहता मुलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांनी नुकतीच एक मोहीम हाती घेतली. 'ऑपरेशन री-युनाइट' असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेच्या पथकांनी या मोहिमेत
सहभाग घेतला.
पोलिसांनी या मोहिमेत बेपत्ता, अपहरण झाल्याची नोंद असलेल्या ६० मुले आणि १३५ मुलींना शोधून काढले. ‘ऑपरेशन री-युनाइट'मध्ये सापडलेल्या १५४ मुले आणि १२२ मुलींची कुठेच कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती या कारवाईतून समोर आली. अल्पवयीन असतानाही कामाला जुंपलेल्या आठ बालकामगारांची सुटका करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. 
मुंबईत बेघरांची संख्या खूप आहे. हे बेघर रात्री रस्त्याच्या कडेला, पदपथांवर, पुलाच्या खाली, दुकानांच्या आडोशाला झोपतात. लहान मुलेदेखील अशीच मोकळ्यावर झोपत असल्याने या मुलांच्या चोरीच्या घटना वारंवार घडतात. मुंबईतील हे बेघर आणि रात्री त्यांचे बेसावध झोपणे पोलिसांची डोकेदुखी बनले आहे. अशा बेवारस मुलांचा शोध घेणे खूप कठीण असते तरी मुंबई पोलिसांनी 
 ४८७ मुलांना शोधण्यात यश आले आहे. या कार्यामुळे मुंबई पोलिसांच्या पाठीवर शाब्बासकीशी थाप पडली आहे वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मुंबई पोलिसांचे हार्दिक अभिनंदन 

Post a Comment

0 Comments