वाशीम - राष्ट्रीय हिंदी दिवस निमित्त १४ ते २८ सप्टेंबरपर्यत सुरु असणार्या हिंदी पंधरवडा निमित्तस्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी आयोजीत हिंदी निबंध स्पर्धेत भाग घेवून हा दिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला
हा उपक्रम युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार, नेहरु युवा केंद्र व श्री बाकलीवाल विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने व एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या आयोजनातून राबविण्यात आला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, लेखापाल अनिल ढिंगे, नेहरु युवा केंद्राच्या सदस्या अर्चना मुंडे, प्रियंका इढोळे, दत्ता मोहळे हे लाभले. या स्पर्धेत ६५ एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या निबंध स्पर्धेत ‘विकसित भारत का निर्माण’, राष्ट्र उन्नती में युवकों का योगदान’ हे दोन विषय ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेेच्या माध्यमातून हिंदी राष्ट्रभाषेचा प्रचार व प्रसार, विकासाकडे होणारी देशाची वाटचाल व देशाभिमान विषयी विचार आपल्या लेखणीव्दारे मांडून परिक्षकांची दाद मिळविली. स्पर्धेत प्रथम समिक्षा बोळे, व्दितीय खुशी वाढवे व तृतीय सार्थक पांडे यांनी पारितोषीक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.
0 Comments