Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख समाजाचे थोर कैवारी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांचे प्रतिपादन


 मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत ठाकूरदास मालानी यांच्या हस्ते अमृत कलशाचे पूजन

प्रतिनिधी संजय खडसे

वाशिम : भारताच्या उन्नतीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख हे प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणातील युगपुरुष आहेत. त्यांनी दिन, दलित, पीडित, शेतकरी, विद्यार्थी यांच्याकरीता मोलाचे योगदान दिले असून, जागतिक कृषी प्रदर्शन करून शेतकर्‍यांच्या विकासाकरिता कार्य करणे गरजेचे आहे असा संदेश दिला. भारतीय संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे अशी स्पष्टोक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये आपल्या भाषणातून केली होती. विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची जाणीव ठेवून सामाजिक व देशहिताच्या कार्यात योगदान द्यावे असे गौरव उद्‌गार प्रमुख वक्त्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी अँड रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय वाशिम व डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त रामानुजन सभागृह येथे केले. यावेळी मेरी माटी मेरा देश ह्या महामंत्रांतर्गत अमृत कलशामध्ये प्रत्येकाकडून एक मूठी माती संकलन करुन संस्थाध्यक्ष ठाकूरदास मालानी यांच्या हस्ते अमृत कलशाचे पूजन सोहळा प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष ठाकूरदास मालानी हस्ते करण्यात आले  यावेळी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्राचार्य डॉ. ओमप्रकाशजी झंवर,  उपप्राचार्य डॉ. हेमंत कुमार वंजारी, प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे यांनी प्रतिमांचे पूजन केले.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे गोरगरीब, पीडित, दलित, शेतकरी, व विद्यार्थी  व प्रत्येक भारतीयांवर अनंत उपकार आहेत असे प्रतिपादन केले.    
यावेळी अध्यक्षीय भाषणात ठाकूरदास मालानी यांनी भाऊसाहेबांच्या कार्याला नमन करून त्यांचे कार्य न भूतो न भविष्यती असे भारताच्या प्रगती करता असून, शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरला आजही पासिंग व टॅक्स ही लागत नाही. गोरगरीब, दलित, पीडित, शेतकरी, विद्यार्थी यांच्याकरीता मोलाचे कार्य असल्याचे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. ओमप्रकाशजी झंवर, डॉ. हेमंतकुमार वंजारी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थीनी राधीका दंदे हिचा सत्कार करण्यात आला.                            यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. प्रकाश दाभाडे यांच्यासह न्याक समन्वयिका प्राध्यापिका ललिता दाभाडे,  प्राध्यापक डॉ. सुशांत चिमणे, प्राध्यापक डॉ. सागर सोनी, ग्रंथपाल इढोळे, महादेव सोमाणी, जितेश अग्रवाल, राहुल पांडे, शैलेश घोडके, उमेश ओझा, दीपक गवई यांच्या समवेत ज्ञानेश्वरी काकड, उर्वशी मालपाणी ,स्वरदा धंदे ,अंकित राठोड ,रेणुका जोशी, प्रेरणा पट्टेबहादूर, पौर्णिमा मुराई मयुरी लोखंडे ,गोपाल वाडे, सागर मानकर, गजानन महाले, शुभदा निखाडे ,पल्लवी ठाकूर, काजल पवार, दिपाली राऊत, सत्यशीला जामदडे, मीनल पांडे, सुरज वानखडे,गजानन भड ,शिवाजी बली, कारुनीक सरकटे, आदर्श दामोदर, सुधाकर राठोड, शुभांगी ढाले, रमेश गरपाल, धनंजय तायडे, धर्मसागर अवचार, आकाश राजगुरू, शुभांगी ढाले, सुरज उजवणे, वैभव गोरे आदी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका भाग्यश्री धुमाळे यांनी तर आभार प्राध्यापक डॉ. सागर सोनी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

0 Comments