Ticker

6/recent/ticker-posts

सं.गा.यो.लाभार्थीवर उपासमारीची वेळ.दोन महिन्यांपासून निराधार लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत.

  कारंजा : केन्द्रशासन आणि राज्य शासनाकडून,स्व.संजय गांधी स्वावलंबन व निराधार अनुदान योजना,प्रत्येक  तालुक्याच्या तहसिल कार्यालयाकडून चालवील्या जात असते.या योजनेतून,परित्यक्त्या, घटस्फोटित,विधवा,महिला, दुर्धरग्रस्त आणि दिव्यांग बांधव तसेच वयोवृद्ध निराधारांना त्यांच्या उदरनिर्वाहाकरीता, संजय गांधी अनुदान योजना,इंदिरा गांधी अनुदान योजना आणि श्रावण बाळ योजनेद्वारा दरमहा निराधाराच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जात असते. मागील दहा ते बारा वर्षाच्या मागोव्या वरून असे दिसून येते की,राज्यातील इतर तहसिल कार्यालया पेक्षा,कारंजा तहसिल कार्यालयाचे कामकाज आजपर्यंत व्यवस्थित राहून,निराधारांना साधारणत: दरमहा वेळेवर आर्थिक सहाय्याचे अनुदान मिळत गेलेले आहे.परंतु हल्ली गेल्या दोन तिन महिन्यात अनुदानाचे वेळापत्रक कोलमडले असून,अद्यापपर्यंत जुलै आणि ऑगष्ट अशा दोन महिन्यांचे अनुदान रखडले असल्याने, निराधार मंडळी अनुदाना करीता बँकांच्या येरझारा करीत आहेत. निराधार वयोवृद्ध आणि विधवा महिलांच्या आयुष्यात संगायोच्या अनुदानाची रक्कम ही आशेचा किरण घेऊन येत असते.परंतु दोन तिन महिन्यांपासून शासनाकडूनच अनुदान प्राप्त न झाल्याने अनेकांची उपासमार होत आहे.त्यामुळे कारंजा महसूलचे उपविभागीय अधिकारी साहेब आणि तहसिलदार साहेब कारंजा यांनी शासनाकडे पाठपुरावा करून,निराधारांच्या खात्यात अनुदानाची रक्कम वळती करण्याची मागणी निराधारांकडून केली जात आहे .

Post a Comment

0 Comments