किशोरी पेडणेकर
राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला नसल्याने अनेकांकडून
वाशिम खबर आज महाराष्ट्राचे
संपादक सुधाकर चौधरी
गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, यात एकही महिला नसल्याने अनेकांकडून टीका होते आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यांच्या पक्षात ज्या दोन-तीन महिला आहेत. त्यापैकी एकही मंत्रीपदासाठी लायक नाहीत का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून त्यांनी भाजपाला चिमटा काढला आहे.
नेमकं काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?
“बोल गया सबकुछ लेकींन याद नही अब कुछ, अशी या सरकारची परिस्थिती आहे. आम्ही किती संवेदनशील आहोत, याचं एक चित्र निर्णाण केलं गेलं होतं. मात्र, आता तो भोपळा फुटला आहे. यांच्या मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र, एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली. त्या व्यक्तीला मंत्रीमंडळात घेण्यात आले आहे.”, अशी टीका किशोरी पेडणकर यांनी केली आहे. तसेच “यांच्या पक्षात दोन तीन महिला उरल्या आहेत, त्यापैकी एकही मंत्रीपदासाठी लायक नाहीत का?”, अशा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
0 Comments