अण्णा हजारे यांचे लोकपाल आंदोलन हे षडयंत्र असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या (Thackeray Gat) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चोपडा येथील महाप्रबोधन यात्रेत भाषणादरम्यान केला आहे मात्र लोकपाल आंदोलन ज्या पद्धतीने अण्णा हजारे यांनी उभं केलं हे आंदोलन फक्त इथलं सरकार उलथून लावून लोकांमध्ये संभ्रमित अवस्था निर्माण करत लाट तयार करण्यासाठी होत. मात्र लोकपाल आंदोलनातल्या त्रुटी कधीही दाखवण्यात आल्या नाहीत त्यामुळे हे षडयंत्र असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
संजय शिरसाट यांच्या प्रतिक्रिया नंतरही सुषमा अंधारे आपल्या प्रतिक्रियेवर ठाम :
गोवाहाटी जाताना पहिल्यांदाच मिलिंद गटाची बाजू मांडणारे सर्वात पहिले आमदार संजय शिरसाठ होते मात्र संभाजीनगर (Sambhaji Nagar) मध्ये आता ज्या पद्धतीने अतुल सावे संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार यांना फुल फ्लेक्स अधिकार दिल्या जात आहे यावरून संजय शिरसाठ यांची कुतुंबना होत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले असून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे आपल्या संपर्कात असलेल्या दाव्याबाबतचे गांभीर्य दीपक केसरकरांना कळत नसून संजय शिरसाठ यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यामुळे शिरसाट कधीही परत फिरू शकतात असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला आहे.
0 Comments