बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून भूपृष्ठभागाकडे आले आहे. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होऊन ते पूर्णपणे शमले आहे. तर, उत्तर केरळपासून किनारपट्टीपर्यंत सलग असलेल्या चक्रीय स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. मंगळवारी मध्यपूर्व आणि वायव्य अरबी समुद्र ते उत्तर केरळ आणि कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. १५ डिसेंबरला या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. म्हणजेच या पट्ट्याचा प्रभाव दक्षिण भारतातील राज्यात जास्त राहणार असून राज्यात मात्र कोरडे हवामान राहणार आहे. परिणामी उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना असलेला अडथळा दूर होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा थंडीचे पुनरागमन होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या राज्यातील सर्वच भागात किमान तापमानाचा पारा चढाच आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments