महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी उन्हाळ्यात विजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘मिशन औष्णिक ८००० मेगावॅट’ चे उद्दिष्ट निश्चित केले होते. राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात विजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ती २८हजार मेगावॅटवर गेली. पुढच्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने सर्व संसाधनांचे नियोजन केले. १७ मे २०२३ रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १० हजार ७० मेगावाट वीज निर्मितीचा पल्ला गाठला. यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १० हजार १०२ मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक गाठला होता. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे विजेची वाढीव गरज भागवण्यास मदत होत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments