Ticker

6/recent/ticker-posts

वाशी येथे नवी मुंबईत 'वीर जवान पुरस्कार 2023' सोहळा संपन्न _विजय नाहाटा यांचा ' वीर जवान फाउंडेशन ' चा स्तुत्य उपक्रम_



दि : 27-07-23, बुधवार 
26 जुलै 'कारगिल विजय दिना'चे  औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचे खंदे समर्थक शिवसेना उपनेते मा. विजय नाहटा यांच्या भारतीय सेनेतील जवानांच्या परिवारांना मदतीचा हात देण्याच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'वीर जवान फाउंडेशन' संस्थेच्या वतीने आयोजित 'वीर जवान पुरस्कार 2023 सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

      यावेळी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायक तसेच मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले यांच्यासह ठानेजिल्हाधिकारी अशोक शिनगारे,एम.पी.एस.सी चे चेअरमन किशोर निंबाळकर, रेरा आयुक्त संजय देशमुख,नवी मुंबई  मनपा  आयुक्त राजेश नार्वेकर, ए. सी.पी.सुरेश मेनगडे,डी. सी.पी.विवेक पानसरे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम, उपायुक्त बाबासाहेब रांजळे यांच्यासह नवी मुंबईतील राजकीय नेत्यांच्या हस्ते जवानांच्या परिवारांना 50 हजार रुपये चा धनादेश व मानचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर अविनाश लाड, अशोक गावडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी,रोहिदास पाटील,सुरेश सपकाळ,महिला जिल्हासंघटक सरोज पाटील,शितलं कचरे, कमलेश वर्मा,सह संपर्क प्रमुख सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वीर जवान फाउंडेशनचे संस्थापक दरम्यान या कार्यक्रमात हेमंत कुमार महाले यांच्या संगीत संयोजनत देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यावेळी  या सोहळ्याचे नेतृत्व वीर फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक सुरेश काकडे यांनी केले. तसेच सुरेख सूत्रसंचालन आर जे विधी जैन यांनी केले. याप्रसंगी माजी सैनिक तसेच एन.सी.सी. जवान व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 _"मागील चार वर्षापासून हा सोहळा वीर जवान फाउंडेशनच्या नेतृत्वात भारतीय जवानांच्या परिवारांसाठी सातत्याने काम करीत आहे. भविष्यात या परिवारांची सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक प्रगती करण्यासाठी नवी मुंबईत भूखंड घेऊन बहुउद्देशीय इमारत उभी करण्याचा मानस या संस्थेचा आहे त्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आल्याचे संस्थापक विजय नाहटा यांनी सांगिलेत. तसेच भविष्यात कोणत्याही वीर जवानांच्या कुटुंबियांना काहीही गरज लागली तरी आपण त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्द असल्याचे विजय नाहटा यांनी सांगितले.
कार्यक्रमास नवी मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Post a Comment

0 Comments