Ticker

6/recent/ticker-posts

पाण्याचा सूक्ष्म पद्धतीने वापर करा. आ. देवेंद्र भुयार


वाशिम  पाणी हे जीवन आहे पाण्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे व शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल तरच त्यांचं हिरवं स्वप्न खुलेल म्हणून पाण्याचा वापर सूक्ष्म पद्धतीने करा असे अमरावती जिल्यातील  पंढरी मध्यम प्रकल्पा  अंतर्गत  वरुड तालुक्यातील एकूण पन्नास हुन  जास्त गावां मधील समाविष्ट लाभ क्षेत्रात लाभ धारक् शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ् यांकडून व्यवस्थापन कायदा ,२००५ व अधिनियम २००६ अन्वये १९ पाणी वापर संस्थांची उभारणी करण्यात येत  असून या निमित्ताने वरुड येथील खेर्डे मंगल कार्यालयात मा.आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले.
यावेळी  डॉ. विजय देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत पाणी वापर संस्था उभारणीच्या अभियानास प्रारंभ झाला 
या भू अंतर्गत बंदिस्त पाईप वितरण प्रणाली द्वारे नऊ हजार हेक्टर लागवड योग्य क्षेत्र उन्हाळी हंगामा च्या पिका करिता ओलिता खाली येईल असे चित्र पहावयास मिळत आहे.
या प्रसंगी अभियानाचे राज्य समन्वयक श्री राजेंद्र कासार पाटील  अध्यक्ष सुप्रभा प्रतिष्ठान  पुणे यांनी प्रास्तविक पर मार्गदर्शन केले .तसेच
 विकास आराखड्यातील बांधकामा इतकेच पाणी वापर संस्थांची उभारणी ही महत्त्वाची असून आपण
पाणी वापर संस्थांच्या २००५ च्या कायद्याचा अभ्यास हा पाणी वापर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे   त्या शिवाय पाणी वापर संस्था कशा चालवायच्या हे समजणार नाही व संस्था ह्या फक्त नावा पुरत्या स्थापन होतील या साठी शासना चा जलसंपदा विभाग  पाणी वापर संस्थांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे या अनुदानाचा शेवटच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा लाभ  मिळाला पाहेजे यासाठी  सर्वांना उन्हाळी हंगामात वेळेत व  किमान तीन-चार महिने हक्काचं पाणी  प्राप्त होण्या  साठी सक्षम अशा पाणी वापर संस्था व संचालक  निर्माण करणे गरजेचे असल्याचे  राजेंद्र कासार यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसाठी माननीय् आमदार देवेंद्र भुयार साहेब यांनी विशेष प्रयत्न करून निधी आणला आहे त्याचे सार्थक व्हावे म्हणून सदर 
सिंचन प्रणाली आधुनिक व बंदिस्त असल्याने प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले 
 या प्रकल्पचे मुख्य व  अमरावती मध्यम प्रकल्प विभागाचे का.अ. आडे साहेब तसेच उपविभागाचे अधिकारी मा.ठाकरे साहेब यांचे मार्गदर्नातून या संस्थांची उभारणी जल संपदा विभाग करीत आहे व त्या नुसार शासना मार्फत आवश्यक ते सर्व प्रशिक्षण व संस्था उभारणी चे कार्य एन जि ओ माध्यमातून श्री राजेंद्र कासार सुप्रभा प्रतिष्ठान  पुणे  हे करीत असल्याचे अभियंता श्री अभिषेक पोहोरे  यांनी स्पष्ट केले व तांत्रिक विकास आराख ड्याची विस्तृत माहिती त्यांच्या भाषणात सांगितली.  
या प्रकल्पावर सुधारित मान्यते ने  भरीव निधी मा देवेंद्र भुयार साहेब यांनी मंजूर करून आणला या बद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले.व पाणी वापर संस्था उभारणीचे महत्व विषद केले व 
बंदिस्त प्रणाली मुळे  पाण्याची बचत होईल कालवा बंद पाण्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला पुरेसे पाणी मिळेल भूगर्भातली घटनारी पाण्याची पातळी व विहिरीची पातळी बोअर उपसा या वर डार्क झोन म्हणून कलेक्टर साहेबांनी घोषित केलेलं लाभक्षेत्र भविष्याच्या दृष्टिकोनातून एक गंभीर इशारा समजला जावा त्यासाठी वरुड परिसरातील प्रकल्प लाभक्षेत्रात असलेल्या पंढरी प्रकल्प हाच सर्व शेतकऱ्यांसाठी वरदानी ठरू शकतो आणि म्हणून बांधकाम उभारणीस सर्वसानी सहकार्य केले पाहिजे   पाण्याचं व्यवस्थापन पाणी वापर संस्थांनी केलं पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयास हवे ही संधी एकदाच मिळते  सिंचना त्या पाणी मोजून घ्या पाण्याचे पैसे वेळेत भरा  थकबाकीदार असू नका संस्थेस सहकार्य करा असे आवाहन या प्रसंगी मा.देवेंद्र भुयार साहेबानी केले महाराष्ट्रात सर्व दूर  पाणी वापर संस्थेच्या उभारणीच्या कार्याला नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे 
या प्रसंगी् महाराष्ट्रातील प्रसिद्ध  वरुड येथील डॉ. शरद  पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय देशमुख यांनी संस्था व्यवस्थापनाचे धडे दिले 
 ते यशस्वी पणे गत विस वर्षाहून अधिक काळा पासून पाणी वापर संस्था चालवत आहे त्यां संस्था खाजगी तत्त्वावर चालते शासनाचे एकही पैसा अनुदान न घेता कर्ज काढून संस्था उभी करून ती यशस्वी करून दाखविली शासनाचा राज्य स्तरीय तसेच केंद्राचा व आंतर राष्ट्रीय पुरस्काराणे त्यांना घोषित केले आहे    शासनाच्या पाण्याचे पैसे ती संस्था नियमितपणाने भरते संस्थेचे अस्तित्व असल्याशिवाय सिंचन व्यवस्थापन अशक्य आहे सर्वांना पाण्याचा लाभ होण्यासाठी व लाभक्षेत्रातल्या शेवटच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा पाणी मिळावे यासाठी संस्था आवश्यक आहेत आपणा सर्वांना पाणी वापर संस्था उभारणीच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा देत  आभार प्रदर्शन श्री राजेंद्र हरणे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सदस्य व शेतकरी वर्ग उपस्थित होता.
शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments