अनसिंग (जि. वाशिम) |
दि. ८ जून रोजी अनसिंग येथे "मोदी सरकारच्या ११ वर्षांचा विकास" या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम राजस्थानी भवन येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व वाशिम जिल्ह्याचे संपर्क मंत्री मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिमचे आमदार मा. श्यामभाऊ खोडे होते.
या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांचा अनसिंग मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सई ताई डहाके, राजू पाटील राजे, विजयराव जाधव, सुरेशभाऊ लुंगे, डॉ. अशोक हेडा, डॉ. गंगावणे, नितेश मलिक, विजय काळे, डॉ. राजीव काळे, मायाताई वाघमारे, शुभदा नायक, राहुल तूपसांडे, लखनसिंग ठाकूर, प्रा. वीरेंद्रसिंह ठाकूर, चंद्रकांत ठाकरे, गोपालदास चितलांगे, जि.प. सदस्य अर्चनाताई खोरणे, बाळूभाऊ मुरकुटे, दिलीप रत्नपारखी, नथूजी कापसे, विनोद जाधव, डॉ. दीपक ढोके, राजाभाऊ मानधने, प्रल्हाद गोरे, रवींद्र पळसकर, विठ्ठल सातव, गजानन नवगणकर, साईनाथ वाघमारे, श्याम ठाकूर, राम अंकुशकर, राजा भैय्या पवार, निलेश पेंढारकर, शंकरराव बोरकर, सतीश उगले, शरद चव्हाण, मोहन गांजरे, विजय नपते, गजानन ढेकणे यांच्यासह जिल्ह्यातील १६ मंडळ अध्यक्ष आणि प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते.
मा. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामांचा सविस्तर आढावा उपस्थित जनतेसमोर मांडला. वाशिम जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून समावेश होत असला तरी महायुतीच्या कालावधीत हा जिल्हा विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कंबर कसून मेहनत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात वाशिम ग्रामीण व अनसिंग मंडळात एकूण १०० नविन कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत आणि सत्कार मा. विखे पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात आ. श्यामभाऊ खोडे, आ. सई ताई डहाके, सुरेश लुंगे आणि विजयराव जाधव यांनी देखील प्रभावी भाषणे केली. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील महिला-पुरुष कार्यकर्ते, नेते, बूथप्रमुख, पदाधिकारी यांच्यासह सुमारे १२०० लोकांची भव्य उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन गणेश खंडाळकर आणि सुभाषभाऊ नानोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बबलू अडाणी, नवनाथ निरगुडे, गिरीधर मुसळे, गजानन नवगणकर, रवींद्र पळसकर, एस. चव्हाण, अवी ढोके, ज्ञानेश्वर ढोके, बालूभाऊ माल, दिगंबर खोरणे, मारुती माने, राजू इंगोले आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
0 Comments