1 11 2020 आजच अंत्यविधीचा कार्यक्रम
बाल ब्रह्मचारी अध्यात्मिक गुरू रामराव महाराज यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या भेटीचा योग लाभला होता. स्व. रामराव महाराज यांची समाजसेवा, त्यांचे आध्यात्मिक ज्ञान व समाजाप्रती त्यांची असलेली तळमळ कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
उपमुख्यमंत्री अजित पवार,
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,
यवतमाळचे
पालकमंत्री संजय राठोड यांनी देखील
शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच वाशिम जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व परिवहन मंत्री सुभाषरावजी ठाकरे
डॉ. रामरावजी महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांनी संत सेवालाल महाराज यांचा वारसा चालवताना समाजातील अनिष्ट प्रथांवर नेहमीच वार केला आणि जनजागृतीचे मोठे कार्य केले. व्यसनापासून दूर राहावे, शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता समाज सुधारणेच्या क्षेत्रातील मोठे मार्गदर्शक छत्र हरपले आहे, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. आदरणीय
रामरावबापू
महाराजांनी केवळ बंजारा समाजाच्याच नव्हे तर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. अनिष्ट रूढ़ी, प्रधा, परंपरा, अंधश्रद्धेविरोधात प्रबोधनाची चळवळ उभारली. त्यसनमुक्तीसाठी लढा दिला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
रामराव महाराजांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. त्यांनी सामाजिक सुधारणांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती व शिक्षणाच्या प्रसारासाठी ते सदैव तत्पर असत. तीर्थक्षेत्र पोहरादेवीच्या संस्थानचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय झाले तेव्हा त्यांच्याशी वारंवार संवाद करण्याचे योग आला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बंजारा समाजाची मोठी हानी : संजय राठोड
डॉ. रामरावबापू महाराजांच्या निधनाने बंजारा समाजाची सामाजिक व सांस्कृतिक प्रचंड हानी झाली असून ती कधीही भरून न निघणारी आहे. बापू महाराजांच्या जाण्याने संपूर्ण समाज पोरका झाला आहे. या महान तपस्वीला बापूजींना श्रद्धांजली अर्पण करतो, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड








0 Comments