Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ दशरात्रोत्सवच्या ४ थ्या दिवशी प्रमुख मार्गदर्शक विलास मनवर , सुधाकर चौधरी यांचा सत्कार





मंगरूपीर तालुक्यातील चेहेल येथे दि. ६/१/२०२२
 वसंतराव नाईक  माध्यमिक आश्रम शाळा चेहल येथे सुरू असलेल्या
क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले
  व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दशरात्रोत्सवच्या ४ थ्या दिवशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  विलास मनवर , जी. प. शाळा लावना मुख्याध्यापक हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे  प्राध्यापक आर. के. गवई सर ,
सत्कार मूर्ती वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी ,वसंतराव नाईक  माध्यमिक आश्रम शाळा चेहल मुख्याध्यापक मोरे सर यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून संपादक सुधाकर चौधरी यांना आमंत्रित करून यांचा  सत्कार करण्यात आला, 



विलास मनवर 
मार्गदर्शनात सावित्रीबाई फुलेच्या कार्यामुळे आधुनिक काळातील स्त्री खऱ्या अर्थाने सक्षम झाल्याचे सांगितले.
सरांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली. रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावातील एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्या सह त्या आपल्या दाभोळजवळील वंणदगावात राहत होत्या. रमाबाई यांचे लग्न त्याकाळीन बाल विवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब ई.स. १९२३ साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावं लागलं. त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण, त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप दुःख पहिली व  ते पाहून त्याही थोड्या थोड्या मेल्या. कारण, लहान पणीच आई व त्यानंतर वडिल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या ७ वर्षानंतर वडीलांसमान सासरे रामजी  सुभेदार यांचा ई. स.  १९१३ साली मृत्यू झाला. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असतांना ई.स.१९१४ ते १९१७ साली रमेश यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात  गेले असताना ,रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील उपभोगल होतं. जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरिर पोखरून गेलं होतं. त्यांना आजार बळावला होता. ई.स. १९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे १९३५ साली तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते.


त्यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती. बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असतं. असेच काही दिवस सुरु असतांना २७ मे १९३५ साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली. खरच, यातून अस म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान खूप मोठ आहे.

बाबासाहेब यांच्या बॅरिस्टर बनण्यामागे रमाबाई यांचे भरपूर मोठ सहकार्य आहे. बाबासाहेबाणा अभ्यासात कुठल्याच प्रकारची अडचण अथवा त्रास होऊ नये या करिता त्यांनी आपल्या परिस्थिती बद्दल काहीच सांगितलं नाही. अश्या या थोर रमाबाई यांच्या बद्दल सांगाव तितकं कमीच पडेल मी या प्रसंगी वेळेच्या अभावी आपल्याला त्यांच्या बाबत थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 




सुधाकर चौधरीआज या ठिकाणी  आपल्या समोर स्वराज्य संप्रेरिका राजमाता जिजाऊं महासाहेबा बद्दल दोन शब्द बोलण्याचे धाडस करत आहे.काही चूक झाल्यास ती पदरात घ्यावी.खरे पाहता राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती नाही असा एकही मनुष्य शोधून सापडणार नाही. ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरविले सुद्धा, त्या म्हणजे माँ साहेब जिजाऊ. पुराणांमध्ये जगाच्या पाठीवर आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो. या आदिशक्तीचे दर्शन जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले. माँसाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही

राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले.



अनेक वर्षांपासून मुघल महाराष्ट्रावर चालून येत होते, येथील दीन जनतेला लुटत होते, आपल्या आया-बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते. कोण थांबवणार त्यांना ? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर परिस्थिती. परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करतांना दहा वेळा विचार करायला हवा असे काही तरी केले पाहिजे. हा विचार आपल्या उराशी माँ साहेबांनी केला.



१९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. माँ साहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँ साहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँ साहेबांकडून मिळाले होते. आणि मातेने बघितलेले स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरविले.

यावेळी वसंतराव नाईक माध्यमिक आश्रम शाळा चेहल येथील विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.  

या कार्यक्रमासाठी  उपस्थिती ए . ए मोरे मुख्याध्यापक,पी.एम. कदम,टी.एन.येवले,जी.पी. खडसे,  कु. मनिषा,मेडम, ए.आर.डाबेराव, ए एम कळसकार,एम.आर. चव्हाण,जी.के.पवार, विद्यार्थी इतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन डि .के .कटारे यांनी केले 


Post a Comment

0 Comments