पूर्वी शेकडो पक्षी, झाडे पहावयास मिळायचे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रसन्न वाटायचे. परंतु प्रदूषण वाढल्याने पक्षांची संख्या कमी झाली. त्यातच मार्च महिन्याच्या सुरुवातील उन्हाळ्याची चाहूल लागली असून वन्यक्षेत्रामध्ये पाण्याची पातळी कमी होत आहे. पाण्यासाठी वन्यजीव व पशु-पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. या वन्यजीवांचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी भटउमरा येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात या मुक्या पशुपक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
याकरिता लागणार्या साहित्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी काळे तथा विनोद इंगळे, सदस्य संतोष काळे, गणेश काळे, गोलू काळे, राजेश काळे, गुणाजी काळे, शंकर काळे, के. कुमार आवारे, किशोर काळे, सौ. संगीता काळे, केशव काळे, श्रीकृष्ण रोकडे, कैलास राजगुरू, हरिभाऊ उमाळे, ज्ञानेश्वर काळे यांनी पुढाकार घेवून आर्थिक मदत दिली. यामुळे विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रोत्साहन मिळाले. या उपक्रमात शाळेचे कांबळे, उपक्रमशील शिक्षक समाधान गिर्हे, मोहन देवळे, कु. वंदना इंगळे, कु. शिल्पा धुळे, कु. अनुराधा सरनाईक आदींनी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली.
0 Comments