विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी परिपत्रक काढून महाराष्ट्र शासनाने पुरोगामी पाऊल टाकले आहे. हेरवाड (जि.कोल्हापूर) ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन परिपत्रकात झाले. राज्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीसाठी हेरवाडचा आदर्श घेऊन कार्य करावे.राज्य समीतीच्या संस्थापक, समन्वयक कालींदीताई पाटील महाराष्ट्र महीला विकास मंच
अमरावती : आजच्या तंत्रज्ञान युगात आपण कितीही प्रगती करत असलो, सर्व जग या नव तंत्रज्ञानामुळे जवळ आले असले तरी आणि कितीही सामाजिक जाणीवेचे सोंग केले तरी आजही समाजात विधवा महिलेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदललेला नाही. अद्यापही शुभकार्यात विधवा महिलांच्या सहभागाला समाजाकडून पाहिजे त्या प्रमाणात स्वीकारण्यात येत नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती असतात. पण समाजाच्या याच मानसिकतेला फाटा देत दर्यापूर तालुक्यातील माहुली धांडे गावातील स्वप्नील रामदास घोगरे या युवकाने मोठा निर्णय घेतला. समाजातील दृष्टिकोन बदलत आपल्या विधवा भावजय (भावची पत्नी) सोबत नुकतीच लग्नगाठ बांधली.आपली विधवा सून मोनिका हिचा विवाह सासरे रामदास घोगरे यांनी मनोभावे लावून दिला. त्यांच्या या निर्णयाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. माहुली धांडे ग्रामपंचायतमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असणारे नंदकिशोर घोगरे (वय.३३) यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांचे जळपास तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या निधनानंतर स्वप्नील व मोनिका यांच्या आदर्श विवाहास माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक सतीश पाटील साखरे व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
कुणाला हवे विधवेचे जीवन जगावे? मात्र, समाज त्यांना पूर्णपणे सामावून घेण्याचा विचार करत नाही. समाजातील अनिष्ट चालीरीतींना विरोध करत माहुली धांडे गावातील युवकाने विधवा भावजयसोबत लग्नगाठ बांधून समजासमोर एक आदर्श ठेवला.
0 Comments