Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातील शाळाचा दर्जा सुधारण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

वाशिम :  वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जि.प.अंतर्गत असेलल्या शाळाचा दर्जा सुधाण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मनसे जिल्हाध्यक्ष मनिषभाऊ डांगे यांच्या मार्गदर्शनात व मनविसे तालुकाध्यक्ष यशभाई चव्हाण व मोहन कोल्हे यांच्यावतीने दि. 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले
त्यांनी निवेदनात म्हटले की, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद  शाळेत पटसंख्या कमी होवून शासनावर शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शाळेचा दर्जा सुधारून शाळेत मराठी भाषेसह इंग्रजी माध्यम व संस्कृत आदी भाषांचा समावेश करण्यात यावा तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी हे सर्व साधारण शेतकरी , शेत मजूर, कष्टकरी वर्गातील असल्यामुळे त्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे. यावेळी त्यांच्यासमवेत शहर उपाध्यक्ष प्रतिक कांबळे सुनील अवगन, पवन डूबे, पवन राऊत, ऋतिक जाधव आदी मनसे सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments