Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर तालुक्याती पेडगांव येथे ढगफुटी सारखा पाऊस पडून शेतातील माती व पेरलेले पिके गेली वाहून


पेडगांव गाव हे तीन ते चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात सर्वात जास्त शेतकरी व शेतमजूरांची वस्ती आहे. पाऊस सूरू होण्याआधी येथील शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन व मजूरी करुन त्यातून येणाऱ्या पैशांमधून बी- बियाणे घेऊन शेतात पेरणी केली . मात्र, मुसळधार पावसाने शेतकऱ्याचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त केले.पाऊस पडून या वर्षी चांगली आवक येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र गेल्या आठवड्याभर पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत होता. परंतु दिनांक 18 जुलै रोजी रात्री झालेला पाऊसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे पेडगांव गावात काल चक्क ढगफुटीसदृश्य पाऊस बरसला आणि याच पावसाने शेतकरी संपूर्ण कोसळला. शेतातील पिके झोपली. इतकंच नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील जमीनच पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे व अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तलावासारखी स्थिती निर्माण झाली. दूरवरून वाहत असलेले पाणी शेतात व नाला थेट शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखोंच्या वर नुकसान झाले. अनेकांच्या शेतात तीन फुटांपर्यंत पूर वाहत गेला.आहे  तसेच मोठ्या वृक्षाची मुळे बाहेर पडली. शेतातील माती गायब होऊन दगड बाहेर पडले एवढी भयानक परिस्थिती या गावात निर्माण झाली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तुंचेही नुकसान झाले.
शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पुरात वाहून आलेले लाकडे जमा झाल्याने पायवाटेवरुन जाताना कसरत करावी लागत होती. त्यातून मार्ग काढून आम्हाला थेट शेतात जावे लागत होते. तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट नुकसाभरपाई शासनाने देण्यात यावी अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असे शेतकऱ्यात बोलले जात आहे.
अशी प्रतिक्रिया सुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. असता त्यांनी घराचेही पंचनामे सुध्दा करावे अशा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments