Ticker

6/recent/ticker-posts

संयमाच्या वादळातील दीपस्तंभ – चंद्रकांत दादा ठाकरे

सुधाकर चौधरी, संपादक – 
वाशिम खबर आवाज महाराष्ट्रचा

“संयम हा यशाचा पाया असतो, आणि जेव्हा तो नेतृत्वाच्या शिरपेचात असतो, तेव्हा त्यातून घडते इतिहासात नोंदवावी अशी वाटचाल.”

वाशिम जिल्ह्याचे एक प्रतिभाशाली, लोकाभिमुख, आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अढळ स्थान मिळवलेले नेतृत्व म्हणजे चंद्रकांत दादा ठाकरे. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून येण्याची संधी समोर असताना, सामान्य माणूस त्या क्षणाचे सोने करून घेतो. पण दादांनी तसं न करता संयमाचा मार्ग निवडला. याच संयमातून त्यांच्या नेतृत्वाची उंची दिसून येते.

अनेकदा क्षणिक यशाची मोहिनी आपल्याला मोठं नुकसान करून जाते. पण संयमाने घेतलेले निर्णय दीर्घकालीन विश्वास निर्माण करतात. दादांनी आपल्या स्वार्थापेक्षा पक्षसंघटनेचा, कार्यकर्त्यांचा आणि जिल्ह्याच्या हिताचा विचार करून जो संयम दाखवला, तो आजच्या राजकीय पातळीवर दुर्मीळ आहे. त्यांच्या या वृत्तीमुळेच आज जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांच्या मनात दादांप्रती प्रेम, विश्वास आणि निष्ठा आहे.

अशा परिस्थितीत दादांनी आता अधिक सजग आणि सावध राहण्याची गरज आहे.कारण संयम ठेवणं जितकं आवश्यक आहे, तितकंच सत्य परिस्थितीची जाण ठेवून सर्व स्तरांवर कार्यकर्त्यांचं पुनर्मूल्यांकन करणंही नेतृत्वाची जबाबदारीआहे.राजकारणात यश टिकवून ठेवायचं असेल, तर विश्वासाला आणि कार्यक्षमतेला बळ देणं आवश्यक ठरतं.

या परिपक्वतेचं मूळ शोधायचं झालं, तर ते आदरणीय सुभाषराव ठाकरे यांच्याकडे जातं. सुभाषरावांनी वाशिमच्या मातीत राजकारणाची नवी व्याख्या लिहिली. कुठलीही मोठी पदं, मोठे अधिकार असूनही, त्यांनी ते कधीही गर्वाने वापरले नाहीत. उलट, आपली साधी राहणी, प्रामाणिक कार्यशैली आणि संयम यामार्फत त्यांनी बड्या बड्या नेत्यांनाही पाणी पाजलं. राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा खेळ नाही, तर ती एक लोकसेवेची प्रक्रिया आहे, हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं.

दादांचं नेतृत्व हे अचानक उभं राहिलेलं नाही. ते आदरणीय सुभाषराव ठाकरे यांच्या सामर्थ्यवान परंतु संयमशील राजकीय परंपरेतून निर्माण झालेलं आहे. सुभाषरावांनी केवळ पद, प्रतिष्ठा, आणि सत्तेच्या माध्यमातून नव्हे, तर प्रामाणिक विचारसरणी आणि माणसांच्या मनातला विश्वास या बळावर आपल्या राजकारणाचा पाया उभा केला. त्यांच्या बंगल्यावर मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, वा कोणत्याही पक्षातील दिग्गज नेते असोत - त्यांची सदिच्छा भेट नियमित असायची. त्या वास्तूत केवळ राजकारण नव्हे, तर समाजकारणाची नांदी होत असे.

आज चंद्रकांत दादा ठाकरे ह्यांचा वाढदिवस. हा दिवस केवळ त्यांच्या आयुष्याचा एक टप्पा नाही, तर तो संयम, साधेपणा, आणि सेवा या तीन महत्त्वाच्या मूल्यांचा उत्सव आहे. त्यांनी पक्षाला, कार्यकर्त्यांना आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेले निर्णय हे केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही प्रेरणादायी आहेत.

दादांचा संयम हा त्यांचं बलस्थान आहे. याच संयमाने आज त्यांचं नेतृत्व वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात दीपस्तंभासारखं चमकतं आहे.

या शुभदिनी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, आणि अधिक बळ मिळो, हीच प्रार्थना.

शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं –
संयम ज्यांच्या रक्तात असतो,
ते लोक गोंधळातही दिशा दाखवतात.
दादा तसंच एक नाव आहे,
जे काळाच्या परीक्षा पास करतंय – आत्मविश्वासानं आणि शांततेनं.

Post a Comment

0 Comments